breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्यांच नाव अखेर बदललं; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

मुंबई : छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांच्या नामांतराची कार्यवाही शनिवारी पूर्ण झाली असल्याची अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे. त्यामुळे यापुढे उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव आणि औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे आजची मंत्रिमंडळ बैठक आणि उद्याच्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमी हा बदल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

महाविकास आघाडीच्या काळात सरकार गडगडत असताना मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत शहराचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ती मंत्रिमंडळ बैठकच अवैध असून नव्याने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव असे करण्यात आले.

हेही वाचा – पुणे-बंगळुरू महामार्गावर नवीन कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात

यापूर्वी औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्यात आले होते. पंरतु औरंगाबाद विभाग, जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गाव तसंच उस्मानाबाद जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गावाचे नाव बदललेले नव्हते. त्यामुळे शहरानंतर इतर नावे शुक्रवारी राज्य सरकारने राजपत्र जारी करुन बदलली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button