breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
LOC ते LAC भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना PM मोदींचा सूचक इशारा
नवी दिल्ली: भारतात सातत्यानं सीमारेषेवर आणि काश्मीरमध्ये कुरघोड्या करणाऱ्या दहशतवाद्यांना आणि पाकिस्तान चीनला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सूचक इशारा दिलेला आहे. भारताच्या सार्वभौमत्वाचा आदर हा सर्वोच्च आहे. यासाठी सीमारेषेवर जवान आपल्या प्राणांची बाजी लावतात.
सैनिक आणि भारत काय करू शकतो हे लडाखमधील घटनेत जगानं पाहिलेलं आहे. एलओसीपासून ते एलएसीपर्यंत ज्यानेही देशाच्या, सार्वभौमत्वावर आणि देशाकडे वाकड्या नजरेनं पाहिले त्याला भारतीय सैन्यानं त्यांच्याच भाषेत चोख प्रत्युत्त दिलं आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरील भाषणात सांगितलेलं आहे.