मतदान कार्ड नसले तरी देखील मतदान करता येणार!
पुणे | राज्यात लोकसभा निवडणूका पाच टप्प्यात होणार असून 19, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार कार्ड व्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत.
त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर नागरिकांना मतदान करता येणार आहे अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. तसेच एखाद्या मतदाराने मतदार यादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेल, पण त्याला अद्याप नवे ओळखपत्र मिळाले नसेल तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल.
हेही वाचा – मतदानावेळी बोटाला लावली जाणारी निळी शाई पहिल्यांदा कधी वापरली गेली? वाचा..
मात्र त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्यासह मतदार यादीत असणे आवश्यक आहे. तसेच सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान दिनांकाच्या किमान पाच दिवस आधी मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहिती निवडणूक कार्यालयाकडून वितरण केली जाणार आहे.