लॉकडाऊन मागे घेण्यासंदर्भात केंद्र सरकार पुन्हा विचार करण्याची शक्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन मंगळवारी रात्री म्हणजे १४ एप्रिलला संपुष्टात येत आहे. हा लॉकडाऊन वाढविण्यात येण्याची मागणी वेगवेगळ्या राज्यांकडून केली जात असली तरी आर्थिक आघाडीवरील नुकसान टाळण्यासाठी काही क्षेत्रातील दैनंदिन काम पुन्हा सुरू करण्याला सरकार परवानगी देणार असल्याचं म्हटलं जात आहे…सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व नियम पाळून काही क्षेत्रातील काम सुरू करण्यात येणार असल्यांचीही शक्यता वर्तवली जात आहे …
देशातील १६१ जिल्ह्यांमध्ये सध्या एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. कोरोना संशयितही कोणी नाही. त्यामुळे त्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचा कालावधी वाढवणे गरजेचे नाही, असा एक मतप्रवाह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा त्यावर विचार करत आहेत. पण या संदर्भात अजून कोणताही निर्णय झालेला नाही, असही या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या चार राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, राजस्थान आणि दिल्ली या चार राज्यांमधील परिस्थिती जास्त गंभीर आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी निम्मे केवळ या चार राज्यांमध्येच आहेत. यामुळेच या चार राज्यांना वगळून इतर ठिकाणी टप्प्याटप्याने लॉकडाऊन मागे घेण्याचा सरकार विचार करत असल्याचही या अधिका-यांनी म्हटलं आहे…