breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा म्हणजे पब्लिसिटी स्टंट, रामदास आठवलेंची टीका

मुंबई – किसान सभेने मुंबईत केलेलं आंदोलन म्हणजे पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची गरज नव्हती असंही आठवलेंनी म्हटलं आहे. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसने आठवलेंवर टीका केली असून आठवलेंनी आपल्या या वक्तव्यासाठी माफी मागावी असं काँग्रेसने म्हटलं आहे.

“केंद्र सरकारने कायदा केला असून तो मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. शेतकऱ्यांनी आता आंदोलन थांबवायला हवं,” असं आठवले यांनी म्हटलं आहे. आठवलेंनी शेतकऱ्यांचा अपमान केला असून त्यांनी तातडीने माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केलीय.

वाचा :-राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे, पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही”

सर्वोच्च न्यायालयानेही सध्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. तसेच केंद्र सरकारनेही दोन वर्षांसाठी हे कायदे लागू न करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे, अशी आठवणही आठवले यांनी करुन दिली आहे. याच दोन गोष्टींचा संदर्भ देत आठवलेंनी पुढे हे आंदोलन केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी करण्यात आलं आहे, असं टोला केंद्र सरकारला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांचे नाव न घेता लगावला आहे. केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करत असून त्यांना न्याय मिळून देण्यासाठी काम करत असल्याचंही आठवलेंनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांनी आता सरकारचं ऐकून घ्यायला हवं आणि आंदोलन थांबवायला हवं, असंही आठवले म्हणाले आहेत.

आठवलेंनी असं वक्तव्य करुन राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांचा अपमान केल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आठवलेंनी हे आंदोलन म्हणजे लोकप्रियता मिळवण्यासाठी केलेलं आंदोलन असल्याचं भाष्य करत शेतकऱ्यांचा अपमान केल्याचं मत व्यक्त केलंय. तपासे यांनी जारी केलेल्या एका व्हिडीओमध्ये आठवले एक मंत्री आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी तातडीने देशातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची माफी मागायला हवी, असं म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button