breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शरद पवार यांची अजित पवार गटावर टीका; म्हणाले, ईडीची कारवाई..

मुंबई : अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह अनेक आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार ईडीच्या भितीने भाजपकडे गेले असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. ते पुणे येथे अका कार्यक्रमात बोलत होते.

शरद पवार म्हणाले, देशात काही जणांविरोधात ईडीची कारवाई केली जात होती. त्यामुळे आमच्या काही सहकाऱ्यांनी रस्ता बदलला. ईडीच्या भीतीने हे सर्व केले गेले. ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याचे सांगतात. पण, आमची वैचारिक भूमिका बदलली नाही. तिकडं आत जावं लागेल, अशी भूमिका तिकडे गेलेले काही लोकं मांडतात. राजकारणात सत्याची कास सोडून जात असतील. तर अशा लोकांना सामान्य लोकं त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

हेही वाचा – ‘कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू करण्याचा निर्णय तत्काळ मागे घ्या’; अमोल कोल्हे यांची मागणी

गेल्या सहा महिन्यांत गुजरात किंवा अन्य राज्यात किती प्रकल्प गेले. जो कारखाना राज्यात येणार होता. तो कारखान येथून अन्य राज्यात हलवला गेला. यात चांगले काम करण्याची संधी राज्य सरकारने गमावली आहे, असं शरद पवार म्हणाले.

कांद्यावर शुल्कवाढ केल्याने जगातील मार्केट शेतकऱ्यांसाठी बंद झालं. अशी टीका शरद पवार यांनी केंद्राच्या कांदा निर्यात धोरणावर केली. काहीही निर्णय घेतले जातात. वाराणसी जिथून पंतप्रधान निवडून येतात. तिथं गांधीवादी संस्था आहे. १९६० साली जमीन रेल्वे खात्याकडून घेतली होती. विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, लालबहाद्दूर शास्त्री यांच्या सह्या होत्या. गांधीवादी विचाराचा प्रचार प्रसार केला जात होता. हे सारं थांबवायला सांगण्यात आलं. तिथली गांधी विचारांची पुस्तकं फेकून देण्यात आली. अशी भूमिका वाराणसीमध्ये घेतली जाते. ज्या ठिकाणाहून पंतप्रधान निवडून येतात. याचा अर्थ सत्तेचा गैरवापर करण्यासाठी कोणत्या पातळीवर सरकार जात आहे, अशी टीका शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button