‘चुकून नितीन गडकरींचं नाव घेतलं तर..’; ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी एनडीए आणि विरोधकांची इंडिया आघाडीकडून जोरदार तयारी सुरू आहे. एनडीएचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. तर इंडिया आघाडीतून पंतप्रधान पदासाठी अजून कोणाच्याही नावाची चर्चा नाही. दरम्यान, यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मोठं विधान केलं आहे.
प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, प्रत्येक पक्षातील लोकांना वाटतं की त्यांच्या नेत्याने पतंप्रधान व्हावं. तुम्ही जर मला विचारलंत तर मी म्हणेन उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान व्हावं.
हेही वाचा – PF खात्यातील तपशील अपडेट करण्यासाठी नवी प्रक्रिया
तुम्ही जरा विचार करा, एका बाजूला भाजपा आहे, जिथे सगळेजण घाबरत घाबरत नरेंद्र मोदींचं नाव घेतात. चुकून जरी नितीन गडकरींचं नाव घेतलं तर त्याची कारकीर्द संपवली जाते. तर दुसऱ्या बाजूला आम्ही आहोत. आमच्याबरोबर सहा राज्यांचे मुख्यमंत्री आहेत, वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख आणि राष्ट्रीय नेते आहेत. आमच्याकडे अनेक नेतृत्व आहेत, असं प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या.
आम्ही देशात काम केलं आहे. जनता आमच्याबरोबर आहे. तसेच आमच्याकडे अनेक नेतृत्व आहेत. आमच्याकडे सगळेजण म्हणू शकतात की आमचा नेता पंतप्रधान व्हावा. हा देश चालवण्याची इतकी क्षमता आमच्याकडे आहे. त्यामुळे जनता जो विश्वास दर्शवेल आम्ही त्यावर ठाम राहू, असंही प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या.