मदत म्हणून जास्त धान्य हवं होतं तर जास्त मुलं जन्माला घालायला हवी होती; उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य
उत्तराखंड |
उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी रविवारी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कोरना कालावधीमध्ये सरकारकडून देण्यात आलेल्या अन्नधान्याच्या मदतीसंदर्भात भाष्य करताना ज्या कुटुंबामध्ये व्यक्तींची संख्या जास्त आहे त्यांना सरकारकडून कमी मदत राशन मिळालं, असं रावत म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी ज्यांनी २० जन्माला घातली त्यांना अधिक मदत मिळाली यामध्ये त्यांच्याबद्दल मनात द्वेष ठेवून काही होणार नाही. तुम्ही जास्त मुलं जान्माला घातली नाही हा तुमचा दोष आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य रावत यांनी केलं आहे.
नैनिताल जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान बोलताना रावत यांनी उत्तम दर्जाचा तांदूळ करोना काळात मदत म्हणून गरीब आणि गरजू कुटुंबाना देण्यात आल्याचा दावा केलाय. मदत म्हणून देण्यात आलेला एवढ्या चांगल्या दर्जाचा तांदूळ आपण यापूर्वी पाहिलेला नाही. काहींनी तर हा तांदूळ साठवून नंतर विकला, असं रावत म्हणाले. करोना कालावधीमध्ये मदत म्हणून करण्यात आलेल्या धान्यवाटपासंदर्भात बोलताना रावत यांनी प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी पाच किलो धान्य देण्यात आल्याचं सांगितलं. “ज्यांना १० मुलं आहेत त्यांना ५० किलो धान्य मिळालं. ज्यांना २० आहेत त्यांना क्विंटल धान्य मिळालं. ज्यांना दोन मुलं आहेत त्यांना १० किलो मिळालं,” असं राव यांनी म्हटलं. विशेष म्हणजे हे भाषण रावत यांच्या फेसबुक पेजवरुन लाइव्ह वेबकास्ट करण्यात आलं होतं. मात्र नंतर ते डिलीट करण्यात आलं आहे.
वाचा- केंद्र सरकारच बरखास्त करायला पाहिजे- शिवसेना खासदार संजय राऊत