पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा ! ८ दिवस अगोदर रेकी…रेकीसाठी स्थानिकांची मदत अन् स्थानिक भाषेत संवाद

Pahalgam attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या हल्ल्याबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी रेकी केल्यानंतर ही घटना घडवून आणली असल्याची मेथीची उघड झाली आहे. या हल्ल्यात सहा दहशतवादी सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे.
या महिन्याच्या १ ते ७ एप्रिल दरम्यान हल्लेखोरांनी या भागाची रेकी केल्याची माहिती मिळाली आहे.घटनास्थळापासून काही अंतरावर सुरक्षा दलांना नंबर प्लेट नसलेली मोटारसायकल सापडली आहे. दहशतवाद्यांनी याचा वापर केला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. पहलगाम हल्ल्याबाबत गुप्तचर सूत्रांनी मोठा खुलासा केला आहे. ही घटना सहा दहशतवाद्यांनी घडवल्याचे सांगण्यात येत आहे. टीआरएफ कमांडर सैफुल्लाहने हल्ल्याचा कट रचला आहे.
दहशतवाद्यांपैकी 5 ते 7 जण पाकिस्तानचे असल्याची माहिती समोर आली आहे. कोणाला शंका येऊ नये म्हणून स्थानिक भाषेत संवाद साधला जात होता. पोलिसांच्या वेशातल्या स्थानिकांनी दहशतवाद्यांना मदत केल्याची माहिती समोर आली. तसेच पोलिसांच्या वेशातल्या स्थानिकांनी रेकी करून मदत केल्याची माहिती देखील मिळत आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता कोणतं पाऊल उचलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा – पंतप्रधान मोदींनी सौदी दौरा अर्धवट सोडला ; विमानतळावरच अजित डोभाल यांच्यासोबत हाय-प्रोफाइल बैठक
मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करून २६ जणांची निर्घृण हत्या केली. लष्कराच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले, त्यांची ओळखपत्रे तपासली आणि नंतर ते हिंदू असल्याचे सांगत त्यांना गोळ्या घालून ठार मारले. २६ मृतांपैकी बहुतेक पर्यटक आहेत, तर दोन परदेशी आणि दोन स्थानिक नागरिक आहेत.
या हल्ल्यात सुमारे २० जण जखमी झाले आहेत. तथापि, सरकारने आतापर्यंत फक्त १६ मृत्यूंची पुष्टी केली आहे. त्याच वेळी, सुरक्षा यंत्रणांनी काल रात्री उशिरा काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. ३ जुलैपासून सुरू होणाऱ्या श्री अमरनाथ यात्रेपूर्वी झालेल्या या भ्याड हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संलग्न असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने स्वीकारली आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.
त्या हल्ल्यात ४७ सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून परतले आहेत. पंतप्रधान मोदींनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी सौदी अरेबियाहून विमानतळावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी भेट घेतली आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीवर चर्चा केली. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांना आवश्यक पावले उचलून काश्मीरला पोहोचण्याचे निर्देश दिले.