ताज्या घडामोडी
आतंकवादी हल्ल्यात मुंबईतील डोंबिवलीच्या संजय लेले यांचा मृत्यू
संजय लेले हे जम्मू काश्मीरला फिरायला गेले होते.

जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यात मुंबईतील डोंबिवलीच्या संजय लेले यांचा मृत्यू झाला आहे. आता संजय लेले यांचं कुटुंब आता काश्मीरकडे रवाना झालं आहे.
हेही वाचा – PCMC: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण
संजय लेले हे जम्मू काश्मीरला फिरायला गेले होते. काल पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातल्या 6 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. यात संजय लेले, अतुल मोने, हेमंत जोशी हे आहेत. सध्या लेले यांचं कुटुंब हे काश्मीरकडे रवाना झालेलं आहे. या घटनेने डोंबिवलीवर शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे डोंबोवली मधील हे तिघे मावस भावंड आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.