breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: वर्धा जिल्ह्याच्या सीमा मंगळवारपासून सील
वर्धा जिल्ह्यास यापुढेही करोनामुक्त ठेवण्यासाठी लगतच्या चारही जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस मंगळवारपासून प्रतिबंध घालण्यात आला आहे. वर्धेलगतचे नागपूर, अमरावती, यवतमाळ हे तीन करोनाबाधित जिल्हे तसेच चंद्रपूर जिल्ह्यातून येणारी वाहतूक थांबविल्यास वर्धा जिल्हा करोनामुक्त राहू शकतो, असे आरोग्य विभागाने सुचविल्यानंतर जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी या जिल्ह्यातून येणारी आणि वर्धेतून या जिल्ह्यात जाणारी मालवाहतूक थांबविली आहे. मात्र भाजी, फळे, मास व मासे यांची जिल्ह्यांतर्गत वाहतूक खुली राहणार आहे. तसेच दुकानं सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यत सुरू ठेवण्याचे निर्देश आहे.