breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

राहुल गांधी म्हणाले, सरकारने पॅकेजचा पुनर्विचार करावा, शेतकरी, मजुरांच्या खिशात पैसे द्यावेत

नवी दिल्ली | सरकारनं रेटिंग्स तसंच जगातील प्रतिमेचा विचार आज या काळात करु नये. देशातील शेतकरी, मजूर, महिला, तरुण देशाचं रेटिंग्स बनवतात. लोकांच्या खिशात पैसा नसेल तर लोकं काय खाणार? असा सवाल करत शेतकरी, मजुरांना खिशात पैसे द्यावेत अशी मागणी काॅंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. आज त्यांनी लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले की, मागणी आणि पुरवठ्याचं गणित सुधारण्यासाठी पैसे देणं गरजेचं आहे. हे पैसे राज्य सरकार अथवा केंद्र सरकारमार्फत द्या किंवा कसेही द्या पण पैसे द्या, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. तसंच सावधगिरीनं लॉकडाऊन शिथिल करण्याची गरज आहे, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी म्हणाले की, शेतकरी, मजुरांनी हा देश उभा केला आहे. या काळात त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. शेतकरी, मजुर, कष्टकरी हा अर्थकारणाचा पाया आहे. त्यांना सरकारने मदत करायलाच हवी. नुसतं पॅकेज जाहीर करून चाणार नाही तर त्यांच्या खिशात पैसे जायला हवेत, असं ते म्हणाले. लोकांच्या खिशात जर पैसे नसतील तर लोक काय खाणार? असा सवाल करत त्यांनी केंद्र सरकारने सावकाराचं काम करू नये, अशी टीका केली आहे. ते म्हणाले की, भारताच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगची काळजी करु नका, ते रेटिंग नंतर सुधारु शकेल. सध्या भारताच्या मजूर, शेतकऱ्यांच्या काळजीचा विषय आहे. ते सध्या संकटात आहेत, त्यांना आधार द्या, रेटिंग आपोआप सुधारेल, असं राहुल गांधी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button