breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: केंद्राला ग्रामीण भागांची चिंता
गेल्या तीन आठवडय़ांपासून स्थलांतरित मजूर प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या पाच राज्यांमध्ये परतले आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत असून, ही परिस्थिती आटोक्यात कशी आणायची हा प्रश्न केंद्र सरकारपुढे आहे. आतापर्यंत महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात या विकसित आणि शहरी राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत असल्याने केंद्राने तिथे वैद्यकीय पथके पाठवली होती. आता लक्ष ग्रामीण राज्यांकडे वळवण्यात आले आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी पाचही राज्यांचे मुख्य सचिव व आरोग्य सचिव यांच्यासोबत सविस्तर बैठक घेतली. यावेळी करोना रुग्णांना वैद्यकीय सुविधा वाढवण्याचे आदेश देण्यात आले.