मोदी, योगींविरोधात घोषणाबाजी कराल, तर जिवंत गाडेन; भाजपा मंत्र्याचं वादग्रस्त विधान
अलीगढ | महाईन्यूज
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य रविवारी एका जनसभेला संबोधित करण्यासाठी अलीगढमधील नुमाइश मैदानात पोहोचले आहेत. त्यांच्या आधी रघुराज सिंह यांनी उपस्थितांना संबोधित केलं आहे. अलीगढ मुस्लिम विद्यापीठात घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी थेट इशारा दिलेला आहे. ‘मोदी आणि योगी यांच्याविरोधात घोषणाबाजी करणाऱ्यांना मी जिवंत गाडेन,’ असं वादग्रस्त विधान सिंह यांनी केलं आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करतानाही सिंह यांची जीभ घसरली आहे ते म्हणाले,की नेहरूंची कोणती जात आहे का? त्यांचं तर कुटुंबदेखील नव्हतं, असं ते म्हणाले आहेत.
रघुराज सिंह यांनी अलीगढ विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना थेट धमकी दिली. ‘ही मूठभर मंडळी, केवळ एक टक्का असलेली मंडळी, आपल्या देशाचा पैसा वाया घालवत आहेत. देशाशी बेईमानी करत आहेत. मोदी आणि योगी देशाला आणि राज्याला ज्या पद्धतीनं चालवत आहेत, त्याच पद्धतीनं यापुढेही चालवतील आणी जर त्यांच्याविरोधात घोषणाबाजी कराल, तर जिवंत गाडेन, हा देश आम्ही चालवू, तुम्ही फक्त ऐकून घेण्याची तयारी ठेवा नाहीतर तुरुंगात टाकू व कोणालाही सोडणार नाही, देशद्रोहाचा गुन्हा ही दाखल करू आणी मग तुम्हाला जामीनदेखील मिळणार नाही,’ असं सिंह म्हणाले आहेत.