देशात 2 लाख 36 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण, आतापर्यंत 6642 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली | देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढून 2,36,657 एवढी झाली आहे. तर या व्हायरसमुळे आतापर्यंत 6,642 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 1,14,073 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजे यांच्यावरील उपचार हे यशस्वीरित्या झाले आहेत आणि हे सर्व रुग्ण आता बरे होऊन घरी परतले आहे. यापूर्वी शुक्रवारच्या आखड्यांमध्ये नवीन 9,851 कोरोना पॉझिटिव्ह केस आणि 273 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. तर गेल्या चोवीस तारांमध्ये 9,887 नवीन कोरोना केस समोर आल्या आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये 294 लोकांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही वाढली आहे.
अमेरिका, ब्राझिल, रुस, ब्रिटेन, स्पेन आणि इटलीनंतर भारतात कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त प्रभाव आहे. कोरोना रुग्णांमध्ये भारत देश हा जगात सातव्या क्रमांकावर आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशामध्ये 1,10,960 संक्रमित रुग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत 6,642 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1,09,461 रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत. तर एक रुग्ण हा देशाबाहेर गेला आहे. आतापर्यंत 48.27 टक्के रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत.