breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आॅनलाईन बदल्याने गोंधळ ; शिक्षकांनी 415 नोंदविल्या हरकती

सांगली –  शासनाने केलेल्या शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांमध्ये झालेला गोंधळ  तसेच बहुतांशी बदल्या गैरसोयीच्या असल्याने शिक्षकांनी बदल्यांविरोधात 415 हरकती दाखल केल्या आहेत, या हरकतीवर विभागीय आयुक्तांनी अभिप्राय मागविला आहे. तसेच बदल्यांच्या प्रक्रियेबाबत लवकरच बैठक घेणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
ग्रामविकास विभागाने शिक्षक बदल्यांबाबत 27 फेबु्रवारी रोजी काढण्यात आलेल्या आदेशानुसार बदल्या झाल्या नाहीत, त्यामुळे बहुतांशी शिक्षकांवर अन्याय झाला असल्याचे स्पष्ट झाले. अतिरिक्त शिक्षकांचे पहिल्या टप्प्यात समायोजन होणे गरजेचे होते, परंतू समायोजन न करता बदल्या करण्यात आल्या आहेत. सेवाजेष्ठ शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही. तसेच सेवाजेष्ठ शिक्षकांनी कनिष्ट शिक्षकांना खो दिला. समानीकरणाच्या जागा ब्लॉक करण्याची गरज होती, परंतू त्या ब्लॉक करण्यात आल्या नाहीत. पती-पत्नी एकत्रीकरण न करता विस्थापित करण्यात आले.
रँडम राऊंडमध्ये वीस शाळा भरुन घेतल्या नाहीत. शाळा निवडण्याची संधी न मिळाल्याने अन्याय झाला आहे. शिक्षकांच्या गैरसोयीच्या बदल्या झाल्या आहेत. बदल्या करताना शासनाच्या आदेशाचेही पालन केले नसल्याबद्दल अन्याय झालेल्या शिक्षकांकडून 415 हरकती दाखल झाल्या आहेत. याबाबत विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी अभिप्राय मागविला आहे. तसेच बदल्यांच्या प्रक्रियेबाबत लवकरच बैठक होणार आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button