breaking-newsराष्ट्रिय
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान ठार
जम्मू – पाकिस्तानी लष्कराने केलेल्या गोळीबारात राजौरी जिल्ह्यातील प्रत्यक्ष ताबा रेषेवर तैनात असलेला एक भारतीय जवान शहीद झाला. हा जवान सीमा सुरक्षा दलाचा आहे. तीन दिवसांपुर्वीच पाकिस्तानी जवानांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षादलाचे एकूण चार जण शहीद झाले होते त्यात एका असिस्टंट कमांडट दर्जाच्या अधिकाऱ्याचाही समावेश होता. आज ठार झालेल्या जवानाचे नाव विकास गुरंग असे आहे. तो मुळचा मणिपुरचा आहे.
ईदच्या सणानिमीत्त भारतीय जवानांनी सीमेवर संयम बाळगला असतानही पाकिस्तानी बाजूकडून हा प्रक्षोभक गोळीबार करण्यात आल्याचा आरोप सीमी सुरक्षा दलाच्या सूत्रांनी केला आहे. दरम्यान या गोळीबाराला भारतीय बाजूकडूनही दमदार उत्तर देण्यात आले आहे.