मतदानावेळी बोटाला लावली जाणारी निळी शाई पहिल्यांदा कधी वापरली गेली? वाचा..
Election Ink | सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरु आहे. मतदानावेळी डाव्या हाताच्या बोटावर निळ्या शाईने खूण केली जाते. पण ही शाई पहिल्यांदा कधी वापरली? या शाईमध्ये काय आहे हे जाणून घेऊयात..
१९६२ मध्ये देशात तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. तेव्हापासून सर्व संसदीय निवडणुकांमध्ये मतदारांना चिन्हांकित करण्यासाठी निवडणूक शाई वापरली जात आहे. दुहेरी मतदान रोखण्यासाठी हे केले जाते. निळी शाई पाणी, डिटर्जंट, साबण आणि इतर सॉल्व्हेंट्सला प्रतिरोधक बनवण्यात आली आहे.
हेही वाचा – अमोल कोल्हेंच्या ‘त्या’ टीकेला आढळराव पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले, कोल्हेंनी राऊतांसारखी..
म्हणजेच तुम्ही तुमचे हात कशानेही धुतले तरी ही शाई लवकर निघत नाही. ही शाई कर्नाटकातील म्हैसूर येथील म्हैसूर पेंटस् अॅण्ड वॉर्निश लि. कंपनीमध्ये तयार केली जाते. तसेच ही शाई फक्त सरकार किंवा निवडणुकीशी संबंधित एजन्सींनाच पुरवली जाते.