Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुलाच्या लग्नाची पूजा ठेवली, पण घडलं अघटित; नदीवर पूजा करताना दाम्पत्याला जलसमाधी

वर्धाः पत्नीला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेणाऱ्या पतीचाही बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घडनी घडली आहे. वर्धा जिल्ह्यातील साकुर्ली धानोली येथील धाम नदीपात्रात हा प्रकार घडला आहे. बुधवारी ही घटना उघडकीस आली आहे. पती-पत्नीच्या मृत्यूमुळं गावावर शोककळा पसरली आहे.

सत्यनारायणाच्या पुजेतील साहित्य धाम नदीपात्रात विसर्जित करताना महिलेचे पाय घसरला आणि ती पाण्यात बुडाली. तिला वाचविण्यासाठी पतीनेही पाण्यात उडी घेतली. दरम्यान दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. आत्माराम कृष्णा बोरकर (५५), कुंदा आत्माराम बोरकर (४५) दोन्ही रा. तरोडा अशी मृतकांची नावे आहे.

प्राप्त माहितीनुसार, आत्माराम यांच्या मुलाचा सात ते आठ दिवसांपूर्वी विवाह पार पडला होता. त्यानिमित्त त्यांनी घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती. पुजेतील साहित्य विसर्जित करण्यासाठी आत्माराम आणि त्यांची पत्नी साकुर्ली येथील धाम नदीवर गेले होते. कुंदा पुजेचे साहित्य नदीपात्रात विसर्जित करीत असतानाचा त्यांचा पाय घसरल्याने ती नदीतील पाण्यात पडली. पत्नीला पाण्यात बुडताना पाहून पती आत्माराम हा पत्नीला पाण्याबाहेर काढण्यासाठी धडपड करु लागला.

पण, कोणीच मदतीला न धावल्याने आत्मारामने थेट नदीपात्रात उडी घेतली. दोघांनाही पोहता येत नसल्याने तसेच पाण्याचा अंदाज न आल्याने आत्माराम आणि कुंदा हे दोघेही नदीपात्रात बुडाले. घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट येथील पोलीस निरीक्षक के.एम. पुंडकर, संदीप मेंढे, विजय काळे यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह नदीपात्राबाहेर काढून पंचनामा करीत दोन्ही मृतदेह हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी पाठविले. या घटनेने तरोडा गावात शोकाकुल वातावरण पसरले होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button