breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

१४ दिवसच काय, १४ वर्ष मी तुरुंगात राहायला तयार : नवनीत राणा

मुंबई |

हनुमान चालिसा म्हणणं हा जर गुन्हा असेल तर १४ दिवसच काय, १४ वर्ष तुरुंगात राहायला तयार आहे, असं वक्तव्य अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातून कुठल्याही जागी निवडणूक लढवावी, मी त्यांच्याविरोधात उभी राहायला तयार आहे, त्यांनी लोकांमधून निवडून येऊन दाखवावं, असं आव्हान राणांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.

तीन दिवसांच्या उपचारानंतर लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. ठाकरे सरकारने माझ्यावर अन्याय, अत्याचार केला. माझ्यावरील अन्यायाचं उत्तर महाराष्ट्रातील जनता ठाकरे सरकारला नक्की देईल, असं राणा म्हणाल्या. हनुमान चालिसा म्हणणं हा जर गुन्हा असेल तर १४ दिवसच काय, १४ वर्ष तुरुंगात राहायला तयार आहे. राम आणि हनुमानाचं ठाकरे सरकारला काहीही पडलेलं नाहीये. प्रभू राम आणि हनुमानाच्या नावावर ठाकरे सरकारने माझ्यावर अन्याय केलाय. येणाऱ्या काळात जनता त्यांना उत्तर देईल, असं राणा म्हणाल्या.

मुंबईची जनता आणि रामभक्त भ्रष्टाचाराची लंका उद्ध्वस्त करतील

नवनीत राणा म्हणाल्या, माझ्यावर जी कारवाई करण्यात आली त्याबद्दल मी नंतर बोलणार आहे. न्यायालयानं ज्या सूचना करण्यात आल्या त्यांचं पालन करणार आहेत. २७ एप्रिलला डॉक्टरांनी तातडीनं तपासणी करायला सांगितलं होतं. मात्र, ४ तारखेपर्यंत तपासणी करण्यात आली नाही, असा आरोप राणांनी केला. मी मुंबईची मुलगी आहे. मी सांगते की येणाऱ्या काळात मुंबईची जनता आणि रामभक्त भ्रष्टाचाराची लंका उद्ध्वस्त करतील, असं म्हणत त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.

मुख्यमंत्र्यांचा अहंकार मोडला जाईल

“हनुमानाचं नाव घेतल्याने राजद्रोहाचा गुन्हा दाखल होत असेल तर महाराष्ट्राचं हे दुर्दैवं आहे. १४ आम्हाला जेलमध्ये ठेवणाऱ्या या मुख्यमंत्र्यांचा अहंकार मोडला जाईल. जे रावणाचं झालं तेच मुख्यमंत्र्यांचं होणार आहे. हनुमान आणि रामभक्त उद्धव ठाकरेंची लंका खाक करतील”, असा इशाराही रवी राणा यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button