breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

“….तर तो संभाजीराजेंचा क्षणिक आनंद;” चंद्रकांत पाटलांचा टोला

पुणे |

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण केलं होतं. अखेर तिसऱ्या दिवशी सोमवारी त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. राज्य सरकारने त्यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्यानंतर संभाजीराजे यांनी हे उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं. दरम्यान, संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे.

“मराठा समाजाच्या मागण्या देवेंद्र फडणवीस सरकारने तात्काळ मंजूर केल्या होत्या. मात्र महाविकास आघाडीचे सरकार त्याची अंमलबजावणी करण्यात कुचराई करत असल्याने छत्रपती संभाजीराजे यांना आंदोलन करावे लागले. राज्य सरकारने त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले आहे. तथापि संभाजीराजे यांचा असा समज झाला असेल की आपला विजय झाला आहे; तर तो क्षणभंगुर आनंद आहे,” अशी टिप्पणी पाटील यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button