श्रीलंका विरुद्धच्या टी 20 आणि कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
मुंबई | टीम ऑनलाइन
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी आणि टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही मालिकेसाठी बीसीसीआयने 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआयने यासह टीम इंडियाच्या कसोटी संघाच्या कर्णधाराचीही घोषणा केली आहे. श्रीलंका विरुद्धच्या या कसोटी मालिकेपासून रोहित शर्मा टीम इंडियाच्या कसोटी संघाचं नेतृत्व करणार आहे.
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, दीपक हुडा, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि आवेश खान.
कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जाडेजा, जयंत यादव, आर अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि मोहम्मद शमी.