‘दिल्लीतली अदृश्य शक्ती महाराष्ट्र उद्ध्वस्त..’; सुप्रिया सुळेंचं विधान चर्चेत
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली आहे. मला नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सहानुभूती वाटते आहे कारण दिल्लीतील अदृश्य शक्ती महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचं काम करत आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी कायमच सहानुभूती वाटते. कारण दिल्लीतली अदृश्य शक्ती महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचं काम करते आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी असोत सगळ्यांना कमकुवत कसं करता येईल हे पाहिलं जातं आहे.
हेही वाचा – भोसरीमध्ये ढोल-ताशा स्पर्धेचा दणदणाट!
VIDEO | "Of course, I sympathise with Nitin Gadkari and Devendra Fadnavis always because I strongly believe that the 'invisible power' (Adrushya Shakti) of Delhi wants to destroy Maharashtra and I have data to prove it. They don't want Maharashtra to get anything. They want… pic.twitter.com/LcJCV2olkX
— Press Trust of India (@PTI_News) November 23, 2023
मी हवेत हा आरोप करत नाही याचे माझ्याकडे पुरावे आहेत मी हे म्हणणं सिद्ध करू शकते. दिल्लीत बसलेल्या या ‘अदृश्य शक्ती’ मुळे मराठी माणूस, महाराष्ट्रतला हिरे व्यापार, महाराष्ट्रातल्या नोकरीच्या संधी, एवढंच काय क्रिकेट सामनेही त्यांना कमकुवत करायचे आहेत. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.