‘२०१९ सालीच भाजपा आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं असते’; अजित पवार गटातील नेत्याचं मोठं विधान
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. यानंतर शरद पवार गटातील नेते अजित पवार गटातील नेत्यांवर सातत्याने टीका करत आहेत. दरम्यान, अजित पवार गटातील नेते सुनील तटकरे यांनी मोठं विधान केलं आहे.
सुनील तटकरे म्हणाले, २०१७ साली मला आणि अजित पवार यांना सरकारमध्ये सत्तेत सहभागी होण्याबद्दल सांगण्यात आलं. पण, मी आणि अजित पवार सत्तेत सहभागी झालो नाही. काही कारणास्तव ते सरकार स्थापन झालं नाही. नाहीतर २०१७ सालीच भाजपा आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं असते.
हेही वाचा – हिवाळ्यात कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? या ठिकाणांना आवर्जून भेट द्या..
सरकार स्थापन झालं नाही, म्हणून कर्जतमध्येच पक्षाचं शिबीर पार पडले होते आणि तिथून नवीन दिशा घेऊन आपण कामाला लागलो. आता, त्याच कर्जतमध्ये आपलं शिबीर आहे. ‘घड्याळ तेच, वेळ नवी’ या विचारांनी आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे, सुनील तटकरे म्हणाले.
२०१९ साली पहाटेचा नाहीतर सकाळी ८ वाजता शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर अजित पवारांना टीकेचं लक्ष्य करण्यात आलं. पण, तेव्हा अजित पवारांच्या कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसह आमदारांच्या पाठिंब्याच्या सह्यांचं निवेदन तयार करण्यात आलं होतं. शिव, शाहू, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे ठाण्यातील आमदाराचींही सही होती, असंही सुनील तटकरे म्हणाले.