breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

“…म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतोय”- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई |

राज्यामधील महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री पदावर असणाऱ्या अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवसांपासून देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच आज न्यायालयाच्या निकालानंतर देखमुख यांनी राजीनामा दिलाय. परमबीर सिंह यांनी देशमुखांवर १०० कोटींच्या वसुलीचे लक्ष्य देण्यात आल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात आज मुंबई उच्च न्यालायाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी ट्विटरवरुन आपलं राजीनामा पत्र पोस्ट करत राजीनामा देत असल्याची घोषणा केलीय. त्यांनी पत्रात काय म्हटलं आहे पाहुयात….

माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडे अॅड. जयश्री पाटील यांचेद्वारे दाखल याचिकेमध्ये आज दिनांक ५ एप्रिल २०२१ रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत. त्या अनुषंगाने मी, मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे.

सबब, मला मंत्री (गृह) या पदावरुन कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button