breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘दिल्लीतून निधी आणून मतदारसंघाचा विकास करणाराच योग्य खासदार असतो’; शिवाजीराव आढळराव पाटील

पुणे | आपल्याला असा खासदार निवडून देण्याची गरज आहे जो आपले प्रश्न दिल्लीत मांडेल आणि दिल्लीतून निधी आणून आपल्या मतदार संघाचा विकास करेल. या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने विकासाच्या गोष्टी करायला पाहिजे, पण टीका करण्यावर भर दिला जातोय. विद्यमान खासदार गल्ली फिरायचं नाही म्हणतात. पण ते विसरून जातात की, गल्लीतली माणसं तुम्हाला दिल्लीत पाठवत असतात. जुन्नर तालुक्यातील विकास कामे फक्त कागदावर आहेत. मला ते प्रत्यक्षात उतरवायचे आहेत. पर्यटनासाठी जुन्नर तालुका सक्षम पर्याय आहे. पर्यटन म्हणून अनेक प्रकार निधी आपण आपल्या तालुक्यात आणू शकतो, असा विश्वास शिवाजीराव आढळराव पाटलांनी व्यक्त केला.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी आपल्या प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. यातच जुन्नर गावभेट दरम्यान आढळरावांनी पिंपळगाव सिद्धनाथ येथे भेट दिली. यावेळी गावातील पदाधिकाऱ्यांनी आढळरावांना फेटा बांधून औक्षण करत बैलगाडीतून रॅली काढली. यावेळी दोन्ही बाजूनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर श्री समर्थ मंगल कार्यालय येथे महायुतीची जाहीर सभा पार पडली. यावेळी गोळेगाव, अलदरे, पिंपळगाव, गोद्रे व कुमशेत येथील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा    –      काँग्रेसला मोठा धक्का! माजी मंत्री नसीम खान यांची स्वपक्षावर टीका, प्रचारालाही नकार 

यावेळी अजित पवार गटातील आमदार अतुल बेनके म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतून आपण प्रचार दौरा सुरू केला याचा अभिमान आहे. विद्यमान खासदार यांच्या जनतेबद्दल बिलकुल तळमळ नव्हती, जो माणूस निवडून देतो त्याला आपल्याबद्दल तळमळ असली पाहिजे. शाश्वतीने काम करणारा व्यक्ती पाहिजे. ते व्यक्ती आहे शिवाजीराव आढळराव पाटील आता आपल्या तालुक्याला दादांची गरज आहे. धरणातील पाणी नदीला कमी पडू देणार नाही, असा शब्द देतो.

देशामध्ये मोदीजी आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली दादा आपल्याला आपल्यासमोर आहे. मागच्या पंचवार्षिक मध्ये तुम्ही नटरंगला निवडून दिले होते. प्रत्येकाला ठाऊक आहे गल्लीत काम करणार की दिल्लीत गर्जनारा प्रतिनिधी महत्त्वाचा असतो. प्रत्येकाने पेटून उठा आणि दाखवून द्या. हे मतदारसंघ म्हणजे एक घर आहे आणि ते सांभाळणे हे शिवाजीराव दादाराव पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही, असं भाजप नेत्या आशाताई बुचके यांनी म्हटलं.

या प्रसंगी आमदार अतुल बेनके, माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष पांडुरंग पवार, तालुकाप्रमुख भाजपा संतोष नाना खैरे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजळे, पिंपळगाव सरपंच विक्रम खंडागळे, उपसरपंच उज्वलाताई खंडागळे, गोळेगाव सरपंच सुनीताताई मोदे, उपसरपंच हर्षल जाधव, कुमशेत सरपंच रवीशेठ डोके, उपसरपंच निर्मलाताई डोके, अलदरे सरपंच सविताताई सरजने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button