‘छगन भुजबळांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा’; माजी खासदाराची मागणी
मुंबई : जालन्यात आज सर्वपक्षीय नेत्यांचा ओबीसी एल्गार सभा पार पडली. या सभेला मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर हे नेते उपस्थित होते. यावेळी भुजबळांनी मनजो जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र, यावरून राज्यात नवा वाद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावरून माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मोठी मागणी केली आहे.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले, छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत.
हेही वाचा – ‘बिनकामाचे कळप एकत्र येत आहेत’; मनोज जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल
सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 17, 2023
सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली आहे.