पहलगाम हल्ल्याचा एनआयकडून तपास सुरु, पुण्यातील जगदाळे आणि गनबोटे कुटुंबाची घेतली भेट

पुणे : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांच्या घरी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एन आय ए) पथककाने भेट दिली. त्यांच्याकडून संपूर्ण घटनेबाबत माहिती घेतली आहे.
दोन्ही कुटुंबियांचे जबाब नोंदविले आहेत. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयए कडून सुरू आहे. एनआयए च्या पथकांकडून कालपासूनन पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील पीडित कुटुंबीयांच्या घरी जाऊन जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.
दहशवादी हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रमाचा जबाब एनआयए चे अधिकारी नोंदवला आहे. महाराष्ट्रातील ६ जण या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले. महाराष्ट्रातील पीडित कुटुंबीयांच्या घरी जाऊन जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांना ‘या’ विषयावर पुस्तक लिहायला लावणार; पुण्यात अजितदादांची फटकेबाजी
दहशवादी हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रमाचा जबाब एनआयए चे अधिकारी नोंदवणार आहेत. महाराष्ट्रातील ६ जण या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले. यात पुण्यातील २ जण, पनवेलमधील १ जण आणि डोंबिवलीतील ३ मावस भावंडांचा समावेश आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधील बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर, सुरक्षा यंत्रणांनी बुधवारी हल्ल्यात सहभागी असलेल्या संशयित दहशतवाद्यांचे तीन रेखाचित्रे जारी केली. यानंतर सुरक्षा दलांनी शुक्रवारी सकाळी दोन दहशतवाद्यांची घरे उध्वस्त केली.