ताज्या घडामोडीपुणे

औषधी वनसपती मारुआचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे

मारुआच्या पानांमध्ये पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन बी 6 आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक

पुणे : आयुर्वेदामध्ये असे अनेक वनसपतींबद्दल सांगितले आहेत ज्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. बदलत्या ऋतूमध्ये तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे फायदेशीर ठरते. वातावरणातील बदलामुळे तुम्हाला संसर्गाचे आजार होऊ नये त्यासोठी शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे गरजेचे असते. शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तुमच्या आहारात योग्य पोषण घेणे महत्त्वाचे असते. आयुर्वेदामध्ये असे अनेक वनसपतींबद्दल सांगितले आहे ज्याचे सेवन आपल्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवू शरते. त्या औषधी वनसपतींपैकी एक म्हणजे मरुआ. मारुआचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

मरुआ ही एक सुगंधीत वनसपती आहे ज्यामुळे तुमचं शरीर निरोगी राहाते. मरुआचे सेवन तुमची पचनसंस्था निरोगी ठेवते, सर्दी कमी करते आणि तोंडाची समस्या दूर करण्यास मदत करते. चला तर जाणून घेऊया मरुआ खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्या अजून काय फायदे होतात. संशोधनानुसार, मारुआच्या पानांमध्ये पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स, आहारातील फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन बी 6 आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक असतात, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात.

हेही वाचा –  शहराच्या सुरक्षेचा महापालिकेवर भार ?

जर मुलांच्या पोटात जंत असतील तर या समस्येमुळे अनेकदा पोटदुखी आणि उलट्या होतात. मारुआच्या पानांचा रस ही समस्या दूर करण्यास मदत करतो. सकाळी रिकाम्या पोटी मुलांना मारुआच्या पानांच्या रसाचे 4-6 थेंब दिल्यास जंतांची समस्या दूर होते असे म्हटले जाते. त्याची पाने अपचनाची समस्या दूर करण्यास देखील उपयुक्त आहेत. मारुआ चटणी केवळ अपचनाची समस्या सोडवत नाही तर भूक वाढवण्यास देखील मदत करते. मारुआचे नियमित सेवन केल्याने पचनसंस्था चांगली राहते. पोटाशी संबंधित समस्या दूर करते.

सर्दी आणि खोकल्यामध्ये आराम मिळतो
मरुआ पानांचे सेवन केल्याने सर्दी आणि खोकल्यामध्ये आराम मिळतो. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की मारवा मद्यपानासोबत खाल्ल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो. याचे नियमित सेवन केल्याने श्वसनसंस्थेलाही फायदा होतो. डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास असला तरी तुम्ही मारुआच्या पानांचा रस घेऊ शकता, तो प्रभावी आहे. डोकेदुखीपासून मुक्तता मिळविण्यासाठी तुम्ही मारवा ज्यूसचे सेवन करू शकता. डोकेदुखीवर हे रामबाण उपायासारखे काम करते. याशिवाय, मारुआच्या पानांची पेस्ट कपाळावर देखील लावता येते, जी डोकेदुखी आणि मायग्रेनपासून आराम मिळविण्यासाठी एक नैसर्गिक उपाय आहे.

तोंडाची दुर्गंधी दूर करते
मारुआची पाने हिरड्यांच्या समस्या आणि तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहेत. यासाठी मारवाची पाने चावण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होऊ शकते. हिरड्यांची जळजळ कमी करते. घसा खवखवल्यास, मारुआची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो. तथापी, त्याचे जास्त सेवन केल्याने तुमचे काही नुकसान देखील होऊ शकते, म्हणून ते मर्यादित प्रमाणात आणि तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्या.

 

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button