Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

रायगड विकास प्राधिकरणावरून संभाजीराजेंची हकालपट्टी करा; लक्ष्मण हाकेंची मागणी

पुणे | संभाजीराजे छत्रपती यांनी घेतलेल्या रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी काढण्याच्या भूमिकेतून राज्यातील वातावरण जाणीवपूर्वक कलुषित करण्याचा प्रयत्न केला जात असून, रायगड विकास प्राधिकरणावरून संभाजीराजेंची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे. रायगड किल्ल्याचा विकास करण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. त्यासाठी संभाजीराजे छत्रपतींना अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले. मात्र, आता किल्ल्याचे संवर्धन सोडून किल्ल्याचे नुकसानच केले जात आहे, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.

लक्ष्मण हाके म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार व्हावा, म्हणून होळकरांनी मोठी मदत केली. लोकमान्य टिळक, महात्मा फुले आणि होळकरांच्या भूमिकेवरही संभाजीराजेंना आक्षेप आहे का? त्यांनी वाघ्या कुत्र्याच्या स्मारकामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कसा होतो, हे सांगावे. अशा प्रकारच्या भूमिकांमुळे सामाजात तणावाची परिस्थिती निर्माण होते. काही नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे राज्यातील सामाजिक सलोखा धोक्यात येत आहे.

हेही वाचा  :  Yogi Adityanath | ‘सनातन धर्म हाच आपला राष्ट्रधर्म आहे’; योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य

संभाजीराजे छत्रपती यांनी स्मारक काढण्यासाठी राज्य सरकारला ३१ मार्च अल्टीमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. ३१ मार्चला आम्ही पंतप्रधानांना चौंडीत बोलणार आहोत. मग, अशा वेळी वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून आंदोलन का केले जात आहे? ३१ मार्च हीच तारीख कशासाठी निवडण्यात आली, असे प्रश्न विचारत हाके यांनी धनगर समाज म्हणून आमचा या भूमिकेला विरोध असल्याचे स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button