जुही चावलाची मुंबईतील हवेत असणाऱ्या दुर्गंधीविषयी पोस्ट
दिवस रात्र एखाद्या गटारात राहत आहोत असं वाटत आहे.

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटी कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. पण अनेकदा सेलिब्रिटींची पोस्ट वादग्रस्त ठरते. काही वर्षांपूर्वी अभिनेत्री जुही चावला हिने मुंबई शहर आणि मुंबईतील हवेत असणाऱ्या दुर्गंधीविषयी पोस्ट केली होती. पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. मुंबई शहराबद्दल वक्तव्य केल्यामुळे अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. शिवाय राजकीय वर्तुळामधूनही अभिनेत्रीला टीका सहन करावी लागली होती.
जुही चावला हिने 22 ऑक्टोबर 2022 मध्ये एक ट्विट केलं होतं. ट्विटमध्ये अभिनेत्रीने हवेत असणाऱ्या दुर्गंधीविषयी स्वतःचं मत मांडलं होतं. पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, कोणाच्या लक्षात आलं आहे का? मुंबईतील हवेत दुर्गंधी आहे. पूर्वी वास खाडीजवळून (वरळी आणि वांद्रा, मिठी नदीजवळ नेहमी अस्वच्छ प्रदूषित असणारे जलकुंभ) गाडी चालवताना हा वास यायचा.
पुढे अभिनेत्री म्हणाली, पण आता हे चित्र पूर्ण दक्षिण मुंबईत आहे. एक विचित्र रासायनिक प्रदूषित हवा शहरात आहे. दिवस रात्र एखाद्या गटारात राहत आहोत असं वाटत आहे. अशी पोस्ट अभिनेत्रीने केली होती. ज्यामुळे अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं. एवढंच नाही तर, राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी देखील तेव्हा यावर प्रतिक्रिया दिली होती.
एका कार्यक्रमात उपस्थित राहात देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तींनी असं वक्तव्य करण्यापूर्वी एकदा तरी विचार करायला हवा मुंबईबद्दल अशा प्रकारे वक्तव्य करणं चुकीचे आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
जुही चावला हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आज अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सिनेमांमध्ये गेल्या वर्षांपासून सक्रिय नसली तरी जुही चावला भारतातील श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर जुही चावलाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.