Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शरद पवार गप्प कसे राहु शकतात? संजय राऊतांचा सवाल

मुंबई | ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे, असं मोठं वक्तव्य विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात केले. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. दरम्यान, आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही संताप व्यक्त केला आहे. तसेच, या प्रकरणी संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांनीही निषेध व्यक्त करावा, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले, की महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांवर चिखलफेक करण्याकरता दिल्लीत साहित्य संमेलन भरवलंत का? मराठी साहित्य महामंडळ आहे, जे खंडण्या घेऊन संमेलन भरतात. महामंडळ कार्यक्रम ठरवतात आणि आयोजक सतरंज्या उचलायला असतात. महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी कार्यक्रम ठरवले. त्यांचे पती सार्वजनिक विभागाचे अधिकारी आहेत. हे सर्वांत भ्रष्ट खातं आहे.

हेही वाचा  : छत्रपती शिवरायांच्या ‘या’ १२ किल्ल्यांची जागतिक स्तरावर दखल घेणार

नीलम गोऱ्हेंचं कालचं वक्तव्य म्हणजे त्यांची विकृती आहे. मला आठवतंय, बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की ही कोणती बाई आणली तुम्ही पक्षामध्ये? हे कोणतं ध्यान आणलं पक्षात? तरीही काही लोकांच्या मर्जीखातर त्या आल्या आणि चार वेळा आमदार झाल्या. आणि जाताना ताटात घाण करून गेल्या. या बाईचं विधान परिषदेचं कर्तृत्व समजून घ्यायचं असेल तर पुण्याचे गटनेते होते अशोक हरनावळ म्हणून, त्यांची मुलाखत घ्या. मग हे मर्सिडिज प्रकरण कळेल. विनायक पांडे यांना उमेदवार देण्याकता त्यांनी किती पैसे घेतले होते, हेही त्यांना जाऊन विचारा. त्यांनी नंतर या बाईकडून पैसे वसूल केले होते. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कोणावर थुंकताय? मातोश्रीवर? तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही. अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाहीत. आम्ही दूर झालो, पण तुम्ही अशा प्रकारे विधानं करता. ज्यांनी तुम्हाला आमदार केलं, म्हणून तुमचा रुबाब आहे ना. मराठी साहित्य महामंडळाने माफी मागितली पाहिजे. विश्वासघातकी बाई, असं संजय राऊत म्हणाले.

राजकीय चिखलफेक झालीय, त्याची जबाबदारी शरद पवारही झिडकारू शकत नाहीत. ते पालक होते, ते स्वागताध्यक्ष होते. ज्याप्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले, राजकीय चिखलफेक झाली, तेही तितकेच जबाबदार आहेत. पवारांनी निषेध व्यक्त केला पाहिजे. ते कसे गप्प राहू शकतात? त्यांच्यावर चिखलफेक होते तेव्हा आम्ही उभे राहतो. नीलम गोऱ्हे बाई नाही. तो बाईमाणूस आहे. नीलम गोऱ्हे माफी मागण्याच्या लायकीच्या नाहीत, असंही संजय राऊत म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button