breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

शिरूरमधून निवडणूक लढवणार का? नाना पाटेकर म्हणाले..

पुणे | अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. नाना पाटेकर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सातत्याने होत असते. याबाबत विचारलं असता त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

नाना पाटेकर यांना तुम्ही शिरूरमधून निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, मला फक्त तुम्ही कळवा मी कुठून निवडणूक लढवणार आहे ते. मी खूप ठिकाणाहून निवडणूक लढवणार अशा चर्चा ऐकतो. एकदा मला सांगा की मी कुठून निवडणूक लढवणार.

हेही वाचा    –      Pimpri Chinchwad | नगरसेवक नसल्याने पालिकेच्या ५ कोटी रूपयांची बचत 

राजकारण हा माझा प्रांत नाही. कारण तिथे गेलो तर आत्ता जे काम करतो आहे ते काम करण्यात जे समाधान आहे ते मला मिळणार नाही. मनात आलेलं सगळं आपण बोलू देतील माहीत नाही. तसंच किती राहू देतील ते पण माहीत नाही. त्यामुळे आम्ही नामच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात आहोत. गुवाहाटी, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही आम्ही ही मोहीम घेऊन जात आहोत, असं नाना पाटेकर म्हणाले.

आपण आपल्यासाठी जगत असतोच, पण लोकांसाठी आपण हे काम करत राहू असंही नाना पाटेकर म्हणाले. मागच्या ८ वर्षात नाम फाऊंडेशनने ६५९ गावांत पाणी पोहचवण्याचं काम केलं असं मकरंद अनासपुरे यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button