अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या रांगा
पाकिस्तानच्या भारतात आलेल्या नागरिकांनी तत्काल भारत सोडवा असे आदेश

अटारी : अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या बघायला मिळत आहेत. पहलगाम हल्ल्यानन्यत्र भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना भारतातून निघून जाण्याचे आदेश देण्यात आलेले होते. त्यानंतर आता अटारी सीमेवर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत.
हेही वाचा : Pahalgam Terrorist Attack | “मुस्लीम म्हणून लाज वाटतेय”; पहलगाम हल्ल्यानंतर प्रसिद्ध गायक संतापला
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानचे संबंध चांगलेच बिघडलेले बघायला मिळत आहेत. भारत सरकारने घेतलेल्या 5 मुख्य निर्णयात पाकिस्तानच्या भारतात आलेल्या नागरिकांनी तत्काल भारत सोडवा असे आदेश दिलेले होते. 48 तासांच्या आत या नागरिकांना आपल्या देशात परत पाठवलं जाणार आहे. त्यामुळे कालपासून अटारी सीमेवर पाकिस्तानात परत जाणाऱ्या नागरिकांच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.