breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘नरेंद्र मोदींच्या मानगुटीवर बसायलाच..’; लालूप्रसाद यादव यांचं वादग्रस्त विधान

मुंबई : इंडिया आघाडीची मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर असे दोन दिवस बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव निघाले होते. त्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी वादग्रस्त विधान केलं आहे. मुंबईत आम्ही आता नरेंद्र मोदींच्या मानगुटीवर बसायलाच जात आहोत, असं लालूप्रसाद यादव यांनी म्हटलं आहे.

मुंबईत आम्ही आता नरेंद्र मोदींच्या मानगुटीवर बसायलाच चाललो आहे. नरेंद्र मोदींना आता हटवायचं आहे असा निर्धारच आम्ही केला आहे. जेव्हापासून आमच्या आघाडीने INDIA हे नाव घेतलं आहे तेव्हापासून भाजपाची झोप उडाली आहे. भाजपाच्या विरोधात संपूर्ण देशभरात आम्ही ताकदीने लढणार आहोत. प्रत्येक जागेसाठी थेट लढत होईल. एकीकडे भाजपा आणि त्यांच्याविरोधात इंडियाचा उमेदवार असणार आहे. २०२४ मध्ये नरेंद्र मोदी पदावरून हटणा आहेत हे नक्की आहे, असं लालूप्रसाद यादव म्हणाले.

हेही वाचा – केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आजपासून घरगुती गॅस सिलिंडर २०० रूपयांनी स्वस्त 

महाराष्ट्रातल्या मुंबईत आमची बैठक होणार आहे. या बैठकीत बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मानणारे लोक एकत्र येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना घटना आणि संविधान नको आहे. या देशाचं अखंडत्व आम्ही संपू देणार नाही. गावागावांमध्ये आम्ही प्रत्येक बुथवर आम्ही बाबासाहेबांचा विचार पोहचवणार आहोत, असंही लालूप्रसाद यादव म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button