कोकण दौरा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरीत दाखल
रत्नागिरी – ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेकडो घरांची पडझड झाली असून अनेक ठिकाणी शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज कोकणच्या दौऱ्यावर आहेत. सध्या मुख्यमंत्री रत्नागिरीत दाखल झाले आहेत. सकाळी रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनासोबत आढावा बैठक घेतल्यानंतर ते थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहणी दौरा करणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा :
सकाळी ८.३५ वाजता – रत्नागिरी विमानतळ येथे आगमन
सकाळी ०८.४० वाजता – तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक
सकाळी ९.४० वाजता – हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन आणि गाडीने वायरी ता. मालवणकडे प्रस्थान
सकाळी १०.१० वाजता – वायरी, ता.मालवण येथे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
सकाळी १०.२५ वाजता – गाडीने मालवण येथे आगमन व तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
सकाळी ११.०५ वाजता – निवती, ता. वेंगुर्ला येथे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
सकाळी ११.३० वाजता – चिपी विमानतळ बैठक सभागृह येथे मोटारीने आगमन व नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक
चिपी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रस्थान
दुपारी १२.३५ वाजता – रत्नागिरी विमानतळ येथे आगमन आणि विमानाने मुंबईकडे प्रस्थान