breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘शिवसेनेचा ४० पैकी एकही आमदार निवडून येणार नाही’; जयंत पाटील

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडे १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपावला आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.

जयंत पाटील म्हणाले की, गॅस, पेट्रोल-डिझेलसह वाढलेली महागाई, बेरोजगारीने जनता त्रस्त झाली आहे. भाजप लोकांच्या हिताचे नव्हे तर धनिकांच्या रक्षण करणारा पक्ष असल्याचे जनतेला कळून चुकले आहे. कर्नाटकचे वारे महाराष्ट्रात कर्नाटकचे वारे महाराष्ट्रातही येणार असून भाजपला ३५ टक्के मते आणि ६० जागांच्या वर एकही जागा मिळणार नाही. शेजारच्या घरात आलेलं वार आपल्या घरात येणारच आहे. हे जर कोणाला कळत नसेल तर आमचा नाईलाज आहे. कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रातही पक्ष बदलणारे ४० पैकी एकही आमदार निवडून येणार नाही.

हेही वाचा – ‘पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे १५ प्रकल्प पूर्ण’; आयुक्त शेखर सिंह

सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांसदर्भात निर्णय घेण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना किमान रिजनेबल टाईम दिला आहे. नार्वेकर हे आणखी किती वेळा घेतात याची सर्वोच्च न्यायालयच वाट पाहत आहे. तसेच नार्वेकर आमचे जावई असल्याने ते आमच्या सद्भावनांची दखल घेतील, असं जयंत पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button