“सत्य समोर आणायचं असेल तर नारायण राणेंची नार्को टेस्ट करा”; ठाकरे गटातील नेत्याची मागणी
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची नार्को टेस्ट करण्यात यावी तेव्हाच सत्य बाहेर येईल अशा आशयाची मागणी उद्धव ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केली आहे. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडत नितेश राणे ऐवजी नारायण राणे यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
सत्य समोर आणायचं असेल. अंकुश राणे, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, आणि बाळा यांच्या हत्येत नारायण राणे यांचा सहभाग असल्याची शक्यता असल्याने नितेश राणेंना सोडून नारायण राणेंची चौकशी केली तर अंकुश राणेला कुठे मारलं,कुठे जाळलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समोर येतील, असं ठाकरेगटाचे नेते विनायक राऊत म्हणाले आहेत.
सर्वसामान्य लोकांना नोटबंदीचे परिणाम आजही भोगावे लागतात. नोटबंदीमुळे लोकांना त्रास झाला.आपल्याच हक्काच्या पैशांसाठी रांगेत उभं राहावं लागलं. त्यामुळे या निर्णयाविरोधात लोकभावना आहेत, असंही विनायक राऊत म्हणालेत. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेलं वक्तव्य वादात अडकलं आहे. त्यावरही विनायक राऊत बोलले. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर आहेत आणि स्वराज्यरक्षकही आहेत, असं ते म्हणालेत.
सोबतच, शिंदेगट आणि भाजपचा आदित्य ठाकरेंनी घाम काढला आहे.ज्या पद्धतीने सर्वजण आदित्य ठाकरेंना टार्गेट करता आहेत. त्यातच आदित्य यांचा विजय आहे.महाराष्ट्रातील जनता,तरुण,सर्व शिवसैनिक आदित्य ठाकरेंच्या पाठीशी आहेत.आरोप करण्यापेक्षा चौकशी करा. सत्य समोर येईल, असं वैभव नाईक म्हणालेत.