राज ठाकरेंच कर्तुत्व काय? गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई | वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या सुरक्षेवर दर महिन्याला २० लाख रूपये खर्च होतो, तुम्ही सरकारचे जावाई आहात का? असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे. यावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, राज ठाकरे मालक झालाय का? राज ठाकरेंच कर्तुत्व काय? राज ठाकरेंची पार्श्वभूमी काय? असं बोलायला गेलो, तर मी बरच बोलू शकतो. पण आज तो विषय नाही, आज ती वेळ नाही. त्यांनी टोल नाके बघावेत, सरकारला शहाणपण शिकवू नये. माझ्यावर टीका करण्याऐवढे ते मोठे नाहीत.
हेही वाचा – ‘प्रभू राम आधी महाराष्ट्राचा राजा, त्यानंतर अयोध्येचा’; इतिहासकार सदानंद मोरेंचा मोठा दावा
राज ठाकरे आणि मी वन टू वन, समोरा समोर येऊ द्या, मी काय ते सांगतो?. छोटे नेते, कार्यकर्ते बोलत असतील, तर मी रागवणार नाही, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. राज्य सरकारने अध्यादेश काढून मराठा आरक्षणाचा हा जो निर्णय घेतलाय, त्याला गुणरत्ने सदावर्ते कोर्टात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत, असंही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.