breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘..त्यामुळे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार नाही’; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

मुंबई | मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्युस पाजून जरांगे पाटलांचं उपोषण देखील सोडवलं आहे. यानंतर संपुर्ण राज्यात मराठा समाजाकडून एकच जल्लोष करण्यात येत आहे. यावरून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या काही दिवसापासून सुरू असलेला आंदोलावर चांगला मार्ग निघून त्याची सांगता झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली होती. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हा प्रश्न सुटलेला आहे. याचा मला आनंद आहे. जरांगे पाटील यांचं देखील आभार मानून अभिनंदन करतो. सुरूवातीपासून आपण सांगत आलोय की आपल्याला यातून कायद्याच्या माध्यमातून मार्ग काढावा लागेल. सरसकट करता येणार, मात्र ज्यांच्याकडे नोंदी आहेत. त्यांना देता येईल. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश तसेच संविधानाची तरतुद आहे. आमच्यावर कुठेतरीह अन्याय होईल का? अशी ओबीसी बांधवांच्या मनात भीती होईल. त्यामुळे ओबीसींवर देखील कुठलाही अन्याय होऊ दिला नाही.

हेही वाचा    –      राज ठाकरेंच कर्तुत्व काय? गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल

कुठल्याही प्रकारे ओबीसींवर अन्याय झाला असला कुठलाही निर्णय झाला नाही. किंबवूना नोंदी असलेल्यांना अडचणी येत होत्या. त्या दुर करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांच्या नोंदी नाहीत. पुरावा नाहीत. अशा संदर्भातला हा निर्णय नसून ज्यांच्याकडे खऱ्या नोंदी आहेत. त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात आलाय. या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर भुजबळांचं देखील समाधान होईल. कारण पहिल्या दिवसापासून आमची ओबीसींवर अन्याय होऊ देऊ नये, असा निर्णय घेण्यात आलाय, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. क्यरेटिव्ह पिटीशन आणि सर्व्हे या दोन्ही गोष्टी सुरू राहतील. ज्या लोकांकडे कुठल्याही नोंदी नाहीत. त्यांचा प्रश्न देखील आपपल्या सोडावावं लागेल त्यामुळे त्या शोधण्याचं काम सुरू आहे, असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button