breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘अध्यादेशाची उद्यापासूनच अमलबजावणी करा’; जरांगे पाटीलांची सरकारकडे विनंती

Antarwali Sarathi  : मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सगेसोयरे बाबतचा अध्यादेश देखील काढण्यात आला आहे. दरम्यान, आता या अध्यादेशाची उद्यापासूनच अमलबजावणी करण्यात यावी अशी विनंती मनोज जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. आंतरवाली सराटीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरम्यान यावेळी बोलतांना मनोज जरांगे पाटील म्हणाले की,“ मराठा समाजाच्या ज्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत, त्याच नोदींच्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकराने सगेसोयरेबाबत अध्यादेश काढला आहे. मात्र, या नवीन अध्यादेशानुसार जोपर्यंत किमान पहिला प्रमाणपत्र मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन आंतरवाली सराटीत  सुरूच राहणार आहे. त्यामुळे मराठा समाजाला परिपूर्ण आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याच्या शब्दावर आपण ठाम असल्याचे जरांगे म्हणाले. तर, सरकराने उद्यापासूनच या नवीन अध्यादेशाची अमलबजावणी सुरु करावी अशी विनंती” जरांगे यांनी केली आहे.

हेही वाचा – कोंडी मराठ्यांची की शिंदे सरकारची, राणे, भुजबळांचा थेट विरोध, पटेलांनी हात झटकले

याचवेळी मनोज जरांगे पाटील  यांनी छगन भुजबळ यांच्यावर देखील टीका केली. ‘भुजबळ यांना कळाले आहे की, आता मराठे आरक्षणात गेले आहेत. त्यामुळे काहीतरी बरळायचे म्हणून बरगळत आहे. त्यामुळे गाव खेड्यातील ओबीसी आणि मराठा बांधवांना माझी विनंती आहे, आपण एकत्र राहिले पाहिजे. राजकीय लोक आपल्यात वाद लावतात. मराठा समाजाच्या नोंदी मिळाल्या आहे, त्यामुळे जे व्हायचं ते होणारच आहे. मराठा समाज शंभर टक्के आरक्षणात जाणार आहे आणि तो गेला सुद्धा असल्याचं जरांगे म्हणाले. आमचा कायदा पक्का आहे, भुजबळ तिकडे जेवढं वळवळ करतील तेवढं समजायचं कायदा पक्का असल्याचं समजायचं असेही जरांगे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button