breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘राज्यभरात जेवढे मनसेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे’; दिपाली सय्यद यांचा खोचक टोला

मुंबई : रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. खळ्ळखट्याक या मनसेस्टाईलने पुन्हा एकदा मनसैनिक आंदोलन करताना दिसत आहेत. दरम्यान, यावरून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी मनसेवर खोचक टीका केली आहे.

दिपाली सय्यद यांनी ट्वीट करत मनसेवर निशाणा साधला आहे. मनचेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके व गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहीम घ्यावी,राज्यभरात जेवढे मनचेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे! दोन दिवसाचे काम,उगाच जेलमध्ये महिना भर खाऊन देशाचे नुकसान आणि बाहेर स्टंटबाजी करून पन! युवा नेत्यांना घराबाहेर काढुन कामाला लावा, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – राज्यात पुन्हा पाऊस परतणार, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं?

हे खड्डे पहिल्यांदा पडले नाही. गेले अनेक वर्षे हे खड्डे रस्त्यांवर पडतात. लोक त्याच्यावरूनच जातात. मला आपल्या जनतेच आश्चर्य वाटत. जे लोक तुम्ही निवडून देतात ते तुमच्या समोर रस्त्यावरचे खड्डे आणि इतर सगळे प्रश्न उभे करतात. परत तुम्ही त्याच लोकांना निडवून देतात जाती आणि धर्माचा नावावरती म्हणून हे प्रश्न कधी सुटणार नाही. जो पर्यंत लोकांमधला राग हा मतपेटीत उतरत नाही तो पर्यंत हे खड्डे बुजणार नाहीत.

आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अनेक आंदोलन केली. पदरी काय पडलं ? आणि महाराष्ट्राच नुकसान करतात त्यांना तुम्ही निवडून देता तरी आमचे आंदोलन सुरू आहे. या सगळ्या मधून सरकारचे डोळे उघडतील अशी अपेक्षा आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button