breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘या’ कंपनीकडून ग्राहकांना मिळणार फ्री रिचार्ज; कोरोनाकाळात ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली – संपूर्ण देशभरात सध्या कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यातच अनेक ठिकाणी लोक आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच अनेक कंपन्या सरकारला तसेच नागरिकांना सामाजिक बांधिलकी म्हणून मदत करत असताना पाहायला मिळत आहेत. त्यातच एअरटेल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे.

एअरटेलने आपल्या तब्बल साडेपाच कोटींहून अधिक कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांना मोफत रिचार्ज देणार असल्याची घोषणा केली आहे. कोरोनाकाळात आपल्या ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न एअरटेल कंपनी करताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या या कठीण काळात आपले ग्राहक कुटुंबाशी व आप्तस्वकीयांशी संपर्कात राहावे, यासाठी एअरटेलने मोफत रिचार्ज देण्याची घोषणा केली आहे.

एअरटेलच्या ग्राहकांना 49 रुपयांचा रिचार्ज मोफत मिळणार आहे. ज्यामध्ये ग्राहकांना 38 रुपयांचा टॉकटाईम तसेच 100 एमबी डेटा देखील मिळणार आहे. त्याबरोबरच या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. एअरटेल आपल्या साडेपाच कोटींपेक्षाही जास्त ग्राहकांना याचा लाभ देणार असून यामध्ये जास्तीत जास्त ग्राहक हे ग्रामीण भागातील असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, एअरटेल कंपनीकडून ही मोठी घोषणा करण्यात आली असून ज्या लोकांची रिचार्ज करण्याचे ऐपत नाही किंवा ज्यांना मोबाईलमध्ये रिचार्जची गरज आहे .अशा लोकांसाठी ही योजना नक्कीच फायद्याची ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button