breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: लॉकडाउनचं काय करायचं? सरकारचा खल सुरू
मुंबई, ठाणे, पुणे या महानगरांमध्ये करोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने तेथील टाळेबंदी वाढवावी लागण्याचे संकेत आहेत. मात्र, तुलनेत कमी रुग्ण असलेल्या जिल्ह्य़ांमध्ये टाळेबंदी अशंत: उठवण्याच्या पर्यायावर राज्य शासनाच्या पातळीवर खल सुरू आहे.
राज्यात मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, पालघर आदी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या हद्दीत येणाऱ्या शहरांमध्ये तसेच पुण्यात रुग्णांची संख्या वाढतच आहे. तरीदेखील राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३५ ते ४० टक्के भागांतच करोना बाधित रुग्ण आढळत आहेत. उर्वरित विभागांत तुलनेत संख्या कमी आहे. अशा वेळी या जिल्ह्य़ांमध्ये टाळेबंदी शिथिल करावी का, असा विचार सरकारच्या पातळीवर सुरू आहे.