#CoronaVirus | रत्नागिरीत कोरोनाबाधित तांचा आकडा १८३ वर पोहोचला
रत्नागिरी | जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा वाढताना दिसून येत आहे. मुंबईतून कोकणात आलेल्यांमुळे कोरोना विषाणूचा फैलावर होत असल्याचे पुढे आले आहे. मंगळवारी आलेल्या १४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. आता कोरोनाबाधित रुग्ण संख्या १८३ वर पोहोचली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या १११ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. काल रत्नागिरीत सहा तर संगमेश्वरमध्ये दोन जण कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्ण संख्या १८३ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील होम क्वारंटाईनची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील होम क्वारंटाईनची संख्या ८१,७२७ वर पोहोचली होती तर संस्थात्मक क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या १९३ वर पोहोचली आहे.