breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: क्वारंटाइन कालावधी पूर्ण केलेल्या १० परदेशी तबलिगींना मुंबईत अटक
१० तबलिगींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तबलिगी जमातचे हे सगळे सदस्य इंडोनेशियाचे आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर विविध कलमं लावण्यात आली आहेत.एका वृत्तपत्राने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.तबलिगी जमातच्या दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये झालेल्या कार्यक्रमामुळे करोनाचा प्रादुर्भाव कसा वाढला हे देशाला ठाऊक आहेच. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जाते आहे.या सगळ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. त्यांचा क्वारंटाइनचा कालवाधी संपल्याने आता पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.