breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: कर्नाटकात ३१ मेपर्यंत महाराष्ट्र, गुजरातसह चार राज्यांमधील नागरिकांना प्रवेश नाही- येडियुरप्पा
महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू या चार राज्यातील नागरिकांना कर्नाटकात ३१ मेपर्यंत म्हणजेच लॉकडाउनचा चौथा टप्पा संपेपर्यंत प्रवेश मिळणार नाही असं मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी स्पष्ट केलं. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. येडियुरप्पा यांनी असंही सांगितलं की, लॉकडाउनच्या नियमांची काटोकोर अमलबजावणी केली जाणार आहे. करोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सेवांची दुकानं बंद असतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच करोना प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकानं सुरु असतील तर इतर भागांमध्ये काही परवानग्या देण्यात आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं.