breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: “आयसीयूत असताना चिठ्ठी लिहून ठेवली होती”, जितेंद्र आव्हाडांनी उलगडला करोनाविरोधातील लढा
करोनावर मात करुन राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जितेंद्र आव्हाड घरी परतले आहेत. मात्र आसयीयूत असताना आपण चिठ्ठी लिहून ठेवली होती अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. चिठ्ठीत आपण सगळी संपत्ती मुलीला दिली जावी असं लिहिलं होतं असंही त्यांनी सांगितलं आहे. “मला करोना झाल्याचं कळलं तेव्हा सर्वात पहिला मुलीचा विचार डोक्यात आला. आयसीयूत असताना मी एक चिठ्ठी लिहिली. त्या चिठ्ठीत मला काही झालं तर सगळी संपत्ती मुलीच्या नावे करण्यासंबंधी लिहिलं होतं,” असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. अतिशहाणपणा केल्यानेच मला करोना झाला असंही ते म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.