#CoronaVirus: एका व्यक्तीच्या अहंकारामुळे देशभरात कोरोनाचा उद्रेक, राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र
नवी दिल्ली: देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. कोरोनाची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका केलेली आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करून मोदी सरकारवर निशाणा साधलेला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या या आठवड्यात 50 लाख तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 10 लाखांच्या घरात पोहोचलेली आहे.
लॉकडाउनचे योग्य नियोजन न करता आल्यामुळे एका व्यक्तीच्या अहंकारामुळे देशभरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे, अशी जळजळीत टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केलेली आहे. तसंच,’मोदी सरकार म्हणाले की, आत्मनिर्भर व्हा, याचा अर्थ असा होत आहे की, तुम्ही तुमचा जीव स्वत: वाचवा, कारण पंतप्रधान हे मोरांसोबत व्यस्त आहे, अशी खिल्लीही राहुल गांधींनी उडवलेली आहे.