breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाची बागेश्वर बाबांनी मागितली माफी

संत तुकाराम एक महान संत आहेत मी हात जोडून त्यासाठी माफी मागतो

मुंबई : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाची अखेर बागेश्वर बाबांनी माफी मागितली आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडूनही बागेश्वर महाराजांच्या वक्तव्यावर निषेध व्यक्त केला जात होता. अखेर वाढता विरोध आणि टिका लक्षात घेता बागेश्वर महाराजांना उपरती झाली आहे.

संत तुकाराम एक महान संत आहेत. आमचे आदर्श आहेत. मी एका कथेत बोलताना त्यांच्या बायकोविषयी सांगितले होते. ती विचित्र स्वभावाची होती. ती त्यांना मारहाण करायची हे मी सांगितले होते. त्यामुळे काही पथांच्या लोकांना त्याचे दुख झाले आहे. त्यामुळे मी माझे शब्द मागे घेतो. मी हात जोडून त्यासाठी माफी मागतो, असं बागेश्वर बाबा म्हणाले.

दरम्यान, एका कार्यक्रमात बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकारामांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची. त्याची पत्नी त्याला रोज काठीने मारायची. संत तुकारामांना कुणीतरी विचारलं होतं की तुझी बायको सगळ्यांना मारते आणि लाज नाही वाटत? ज्यावर संत तुकाराम म्हणाले होते की, ही देवाची कृपा आहे की मला मार खाणारी पत्नी मिळाली आहे. जर आपल्याला प्रेमळ पत्नी मिळाली असती तर आपण देवावर प्रेम केले नसते, आपण आपल्या पत्नीच्या प्रेमात पडलो असतो, असं वक्तव्य केलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button